Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकला का करायची आहे भारताशी मैत्री?
भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही.
उलट, भारत आणि पाकिस्तानने २००३च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पाणी वाटपाच्या प्रश्नावरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी शांततेचा आणि युद्धविरामाचा प्रस्ताव पाकिस्तानकडून आलाय. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया पाकिस्तानला भारताशी पुन्हा शांतता का प्रस्थापित करायचीय. आणि भारताचा त्याला प्रतिसाद कसा आहे, सोपी गोष्टमध्ये….
संशोधन - बीबीसी उर्दू टीम, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- शरद बढे
Published on Monday, 22nd March 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.