गोष्ट दुनियेची - भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

Download भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार पावसानंतर पुन्हा पूर आलाय. 2017 मध्येही भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये पुरामुळे 1,200 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला होता. या वर्षीही हा पूर अशाच विनाशाचं कारण बनलाय. एकट्या आसाममध्ये 27 हून अधिक जिल्ह्यांमधल्या दोन हजारांहून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. सरकारी आकडेवारी सांगते की शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

एकट्या महाराष्ट्रात जून महिन्यापासून ७०पेक्षा जास्त बळी गेलेत. त्यामुळे ही आपत्ती आपल्यासाठी आता काही नवीन नाही. पण ही आपत्ती फक्त दक्षिण आशियातच दिसतेय असं नाही. गेल्या वर्षी 'आयडा' या चक्रीवादळाचा तडाखा अमेरिकेला सहन करावा लागला होता, ज्यात 40 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

जगभरातील हवामान शास्त्रज्ञ इशारा देतात की येत्या काही वर्षांत 'निसर्गाच्या कोपाच्या' अशा घटना वाढू शकतात. पण त्यामुळे होणारी जीवितहानी आपण टाळू शकतो का?

आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की पुरामुळे होणारे मृत्यू आपल्याला टाळता येतील का?

संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 30th July 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.